जय जय महाराष्ट्र माझा ! पण महाराष्ट्र गेला कुठे !!
महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष लेख

अजित हरेश पाटील संस्थापक संपादक
१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन, हुतात्मा दिन, कामगार दिन व बौद्ध पौर्णिमा हे चार मोठे दिन सरकारी पातळीवर व सार्वजनिक व्यासपीठावर साजरे झाले.यांसारखे महत्त्वाचे दिवस आपण मोठ्या अभिमानाने साजरे करतो. प्रत्येकाच्या ओठांवर एकच गाणं ऐकू येतं – जय जय महाराष्ट्र माझा. पण प्रश्न असा आहे की, हे गाणं फक्त ऐकण्यासाठी उरलंय का? त्या गाण्यामागचा आत्मा, ती जिद्द, तो स्वाभिमान… तो कुठे हरवला?
आज लाखो-कोटी रुपये खर्च केले जातात वेगवेगळ्या कार्यक्रमांवर – छठपूजा, ३१ डिसेंबरच्या पा
पार्ट्या , मोठमोठ्या राजकीय सभा, नेत्यांच्या मीटिंग्स… सगळीकडे भव्य स्टेज, लाईट्स, सजावट, जाहिरातबाजी! पण जेव्हा महाराष्ट्र दिन येतो, तेव्हा साधा एक दिवा लावायला देखील पैसा नसतो का?
हे दुर्दैव नाही का?
रस्त्यांवर ना सजावट, ना तोरण, ना उत्साह… आणि मग आपण अभिमानाने म्हणतो – “आम्ही मराठी!”
खरंच अभिमान आहे का? की फक्त दिखावा उरलाय?
ज्या भूमीसाठी हुतात्म्यांनी रक्त सांडलं, ज्या महाराष्ट्रासाठी लढा दिला, त्याच महाराष्ट्राचा सन्मान आपण अशा पद्धतीने करतो?
सरकारकडून अपेक्षा असते की त्यांनी महाराष्ट्र दिनाला प्राधान्य द्यावं, पण इथे तर प्राधान्य दुसऱ्याच गोष्टींना दिलं जातंय.
हा प्रश्न फक्त सरकारचा नाही – हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाचा आहे.
आपण स्वतः काय करतो? आपल्या परिसरात आपण काही उपक्रम राबवतो का? की फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपली जबाबदारी संपली असं समजतो?
आज गरज आहे ती फक्त गाणी वाजवण्याची नाही, तर त्या गाण्यामागचा अभिमान पुन्हा जिवंत करण्याची आहे.
महाराष्ट्र फक्त नावात नाही, तो आपल्या कृतीत दिसायला हवा!
जर खरंच “जय जय महाराष्ट्र माझा” म्हणायचं असेल,
तर आधी महाराष्ट्रासाठी काहीतरी करायला हवं!
— संपादक: अजित पाटील
शिवस्वराज्य न्यूज नेटवर्क