hi Hindi en English mr Marathi ur Urdu
आंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडागुन्हेजीवनशैलीटॉप न्यूजतंत्रज्ञानताज्या बातम्याधर्म / ज्योतिषमनोरंजनराजकारणराष्ट्रीयव्यापारशिक्षण

रामरक्षा आंदोलनानंतर शिवसेनेचा आता नगरपालिकांना दणका, गटार पूजन आंदोलन

नालेसफाई न झाल्याच्या निषेधार्थ ठाणे येथे गटार पूजन

 

अजित पाटील कांदिवली, ठाणे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केंद्रातील भाजप सरकारला अयोध्येतील राममंदिर चोरी प्रकरणी राज्यात रामरक्षा आंदोलनांचा धडाका लाऊन घेरलेले असतानाच ठाण्यात गटार पूजन आंदोलन करून आता ठाणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही दणका दिला आहे. 
ठाणे महानगरपालिकेच्या दिवा परिसरातील नालेसफाईच्या कामांवरून राजकीय वातावरण तापले होते. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी थेट ‘गटार पूजन’ केले.

आदित्य ठाकरे यांनी घेतला कांदिवली येथील आंदोलनात सहभाग

अयोध्येतील राममंदिर चोरी प्रकरणी भाजप सरकारचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाराष्ट्रभर राम रक्षा आंदोलन सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कांदिवली पश्चिम येथील काळा हनुमान मंदिरात माजी मंत्री शिवसेना आमदार व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रामरक्षा व हनुमान चालीसा पठणाचा सोहळा आयोजित करण्यात आला.या वेळी मोठ्या प्रमाणात रामभक्त उपस्थित होते. हनुमानाचा वेश परिधान करणाऱ्या आंदोलकास पाहण्यास लोकांनी गर्दी केली होती. टाळ मृदुंग वाजवत आंदोलनस्थळी जाणारे कट्टर शिवसैनिक लोकांच्या कुतूहलाचा विषय होते.

ठाणे येथे राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली महाआरती

अयोध्येतील राम मंदिराच्या तिजोरीत गैरव्यवहार झाल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गावदेवी जवळील पुरातन हनुमान मंदिरात जोरदार आंदोलन करण्यात आले. माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे पठण करून संताप व्यक्त केला.
मुंबई महानगर पालिका सज्जतेत कमी पडली. मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांची कबुली 
दरम्यान मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी शुक्रवारी कबुली दिली की मुंबई महानगर पालिका सज्जतेत कमी पडली. ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणारे वारे व मुसळधार पाऊस यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. याचा अंदाज महानगर पालिकेला आला नाही मात्र आता झालेल्या चुकांपासून धडा घेऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून वृक्षरक्षा समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button