तामिळनाडू, प. बंगाल, केरळम व आसाम विधानसभा निवडणुका कोण जिंकणार ?
पंडीत शंकर शास्त्री यांचे ज्योतिष अंदाज लवकरच शिव स्वराज्य न्यूज वर

पंडीत शंकर शास्त्री राजकीय ज्योतिषी
४मे २०२६ रोजी अत्यंत महत्वाच्या अशा तामिळनाडू, प. बंगाल, केरळम आणि आसाम या चार राज्यातील व पुदूचेरी या केंद्रशासित प्रदेशांतील निवडणुकांचे निकाल घोषित होतील.
केरळम व आसाम येथे विक्रमी मतदान झाले आहे. तामिळनाडू व प. बंगाल येथे प्रचाराचा धडाका सुरू आहे. या चार राज्यात कोण जिंकेल याचा ज्योतिषी अंदाज मुंबईचे प्रसिद्ध राजकीय ज्योतिषी पंडीत शंकर शास्त्री यांच्याकडून खास शिव स्वराज्य नेटवर्क साठी वर्तवण्यात येईल.
या चार राज्यातील निवडणुका ममता बॅनर्जी, एम. के. स्टालिन, हेमंत बिष्व शर्मा, पीनराई विजयन या चार दिग्गज राजकारण्यांचे भवितव्य ठरवणार आहे. तसेच भाजपसाठी सुद्धा या निवडणुका महत्वाच्या आहेत. आतापर्यंत अभेद्य राहिलेले प. बंगाल, तमिळनाडू व केरळ हे तीन बालेकिल्ले भेदल्याचे समाधान भाजपला मिळेल का ? ममता बॅनर्जी आपला गड राखू शकतील ? स्टालिन हिंदी विरोधाच्या अजेंड्यावर राज्यातील मूलभूत समस्यावरून तमिळ जनतेचे लक्ष हटवू शकतील ? हेमंत बिष्व शर्मा पुन्हा बाजी मारतील की गौरव गोगोई, देबब्रत सैकिया हे काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री बनतील ? केरळातील डाव्यांचा गड कायम राहील की यावेळी काँग्रेसला पुन्हा संधी मिळेल ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला चार मे ला नक्कीच मिळतील पण त्यापूर्वी आमचे अंदाज नक्कीच पाहा.